श्रीरामपूर – शहरातील गजबजलेल्या राधिका हॉटेलच्या पार्किंगमध्ये गेले एक महिना भर बेवारस अवस्थेत उभी असलेली इंडिका विस्टा चारचाकी गाडी अखेर पोलिसांच्या लक्षात आली असून, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या सतर्कतेमुळे ही संशयास्पद बाब उघडकीस आली आहे. सदर गाडी पार्किंगमध्ये एक महिन्यापासून दीर्घकाळ उभी असूनही राधिका हॉटेल चालक व शेजारील दुकानदार यांनी ही गोष्ट पोलिसांना आतापर्यंत कळवले नव्हते आल्याची खंत व्यक्त होत आहे. बाबासाहेब शिंदे यांनी गाडीबाबतची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना सदर गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेतली आणि तातडीने जेसीबीच्या सहाय्याने सदर गाडी पार्किंगमधून हटवून पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हलवण्यात आली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी बेवारस अवस्थेत गाडी उभी राहणे ही गंभीर बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या गाडीविषयी काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती. काहींनी ती कोणीतरी विसरून ठेवलेली असेल, असे समजून दुर्लक्ष केले, तर काहींनी तिच्याकडे दुर्लक्षच केले. मात्र, गाडीच्या आसपास कोणतीही हालचाल नसणे, गाडीवरील धूळ व त्याची जीर्णावस्था पाहता ती संशयास्पद असल्याचे बाबासाहेब शिंदे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडीची नंबर प्लेट व चेसिस नंबरच्या आधारे तिच्या मूळ मालकाचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. ही गाडी चोरीची, गुन्ह्यांत वापरलेली किंवा फसवणुकीचा भाग आहे का, याची सखोल चौकशी केली जात आहे.
या प्रकरणातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची जी पातळी आहे, ती कितपत कार्यक्षम आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरे म्हणजे, दीर्घकाळ कोणतीही हालचाल नसलेली गाडी अशा मोकळ्या जागेत उभी राहणे म्हणजे संभाव्य सुरक्षा धोक्याचे लक्षण असू शकते. सुदैवाने यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही, मात्र भविष्यात अशा बाबींमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांनी हा विषय दुर्लक्षित न ठेवता पोलिसांपर्यंत पोहोचवला, त्यामुळेच संबंधित गाडी हटवून तपास सुरू होऊ शकला.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी देखील या प्रकरणात तातडीने कारवाई करत बेवारस गाडी हटवून योग्य ती चौकशी सुरू केल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले गेले आहे. या प्रकारानंतर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी, पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर दीर्घकाळापासून उभ्या असलेल्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. अशा सहकार्यामुळे अनेक संभाव्य घटनांना वेळेत रोखता येऊ शकते. या घटनाक्रमामुळे राधिका हॉटेलच्या परिसरातील सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला असून, हॉटेल प्रशासनाकडून यापुढे सीसीटीव्ही यंत्रणा अधिक कार्यरत ठेवण्याचे आश्वासन दिले जात आहे. सदर इंडिका विस्टा गाडीबाबत सध्या पोलिसांकडून विविध अंगाने चौकशी सुरू असून, तिचा मालक कोण, गाडी तिथे कशी आली, ती का सोडून दिली गेली, यासंबंधीचे सर्व तपशील लवकरच समोर येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची सजगता निर्माण झाली असून, “नजरेआड म्हणजे साजरे” हा दृष्टिकोन बाजूला ठेवून प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या परिसरावर सतत लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.