श्रीरामपूर – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीरामपूर शहरात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास ‘जय श्रीराम आखाडा’ व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी रिपाईचे शहराध्यक्ष विजय पवार व जय श्रीराम आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष पै. अर्जुन दाभाडे यांनी संयुक्तरीत्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक समतेचा मार्ग दाखवणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करत परिवर्तनाच्या कार्यासाठी सदैव प्रेरणा घेत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास राहुल धुमाळ, शुभम राणा, राज चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सहभागींनी संविधान मूल्यांचा जागर साठवून समाजात बंधुता, समानता आणि ऐक्याची भावना जोपासण्याचा संदेश दिला. यानिमित्त शहरात सामाजिक आदर व विचारप्रबोधनाचा स्वर अधिक दृढ झाला.




